*महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात ज्या उमेदवारानीं आपली विचार पुस केली त्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीतून निवडून द्या-समाजरत्न नितीनभाऊ बडेकर*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीची सद्या सूगी सुरु असुन बरेच उच्छुक उमेदवार बाहेर पडत आहेत.ऐकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत, पक्ष निष्ठा,पॅनेल निष्ठेंचे विचार मांडत आहेत ,पण जागृक मतदारांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता कोरोना काळात तुमच्या उपयोगी पडलेल्या उमेदवारांना निवडून द्यावे असे मत समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी कासेगाव येथे प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.निवडणूकीची सुगी आली की बरेच उमेदवार आपल्या दारी मतदान मागणीसाठी येत असतात, तेव्हा समाजसेवेच्या प्रवाहात नसताना उमेदवार आपल्या जवळ आल्यास ,कोरोना काळात आपण काय कार्य केले?. असा प्रश्न त्यांना विचारुन आपल्या उमेदवारीचा अजेंडा काय?. असा सवाल जागृत मतदारांनी विचारायला हवा. निवडणूक लढवून विजयी झाल्यावर वार्डातील कोणकोणती विकास कामे करणार ?, वार्डातील गरीब कुटूंबाच्या सुखदुखासाठी काय अर्थीक भार उचलणार? , गरीब कुठूंबातील व्यक्तीच्या मुलीच्या लग्नात संसारसेट देणार काय? अथवा गरीब समाज्यातील व कुटूंबातील मयत व्यक्तीच्या अंत विधीसाठी येणारा खर्च, अथवा वैध्यकिय सेवासाठी अार्थीक सहाय्य करणार काय? असे स्पष्ट विचारुन आपल्याला योग्य भूमिका पटतील त्या सुशीक्षीत उमेदवारांना आपले मत देवून,योग्य विकास कामाची संधी द्यावी असे आवाहन शेवटी नितीन भाऊ बडेकर यांनी केले आहे.