"अमृत" योजेनेमुळे मिळणार कोल्हापूरकरांना मुबलक व सुरळीत पाणी.- कोल्हापूर शहर जल अभियंता नेत्रदीप सरनोबत.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता.केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या जुन्या पाण्याच्या टाक्या व नवीन उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे. मनपाच्या नियोजनानुसार केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या पाईपलाईनच्या योजनेमुळे 2040 सालापर्यंत शहरातील नागरिकांना त्या- त्या भागात उभारण्यात आलेल्या 27 पाण्याच्या टाक्यांमधून मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.वाढते नागरीकरण व शहराचा विस्तार लक्षात घेऊन या पाण्याच्या टाक्या त्या - त्या भागामध्ये उभारण्यात आल्या असून यासाठी आणखी नवीन पाण्याच्या टाक्या उभाराव्या लागणार नाहीत.

    

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या जुन्या 15 पाण्याच्या टाक्या व सध्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या नवीन 12 पाण्याच्या टाक्या अशा एकूण 27 पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील विविध भागात त्या त्या भागातील पाण्याच्या टाक्यांमधून मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.वाढते नागरीकरण, हद्दवाढीमुळे होणारा शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहराच्या विविध भागांमध्ये या पाण्याच्या टाक्या क्षमतेनुसार उभारण्यात आल्या आहेत,यामुळे भविष्यात आणखी नवीन पाण्याच्या टाक्या उभाराव्या लागणार नाहीत.मार्च 2024 पर्यंत अमृत योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे.

कोल्हापूर शहर जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले की अमृत योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला आहे.या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या प्रस्तावामध्ये शहरातील ड्रेनेज लाईन तीन एसटीपी प्रकल्प व लेक कॉन्सर्वेशन आधी कामांचा समावेश आहे.जुन्या वितरण नलिका,व्हाँल्व्ह वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीच्या असून नलिका जीर्ण झाल्या आहेत.अंतर्गत जलवाहिन्यांची कामे पूर्ण होईपर्यंत जुन्या वितरण नलिकेतून पाणी दिले जात आहे.थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून योजनेचे पाणी देण्यास सुरुवात झाली आहे.योजनेला पूरक असलेल्या शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे.जुन्या जलवाहिनी,व्हाँल्व्ह यांच्यावर पाण्याचे दाब वाढल्याने त्यांना गळती लागत आहे.पाण्याचा हा दाब नियंत्रित करण्या बरोबरच जेथे गळती लागेल ती तातडीने दुरुस्त करून संपूर्ण शहराला एकाच वेळी काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे पाणी देण्याचा प्रयत्न आहे.जेथे गळती सुरू होईल तेथे तातडीने दुरुस्त्या करून पाणीपुरवठा पुरवत सुरू केला जात आहे. अशी माहिती शहर जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जुन्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अमृत थेट पाईपलाईन योजना पहिल्या टप्प्या अंतर्गत नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.यामध्ये कदमवाडी,सम्राटनगर,ताराबाई पार्क, राजेंद्रनगर,बोंद्रेनगर,पुईखडी,शिवाजी पार्क,बावडा जलशुद्धीकरण केंद्र,वाडकर गल्ली- बावडा,गोळीबार मैदान, राजारामपुरी सायबर चौक,राजारामपुरी लकी बाजार,शाहूपुरी भाजी मंडई,मार्केट यार्ड,आपटेनगर आदी ठिकाणी असलेल्या जुन्या व नवीन पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. 

 थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरला मुबलक पाणी मिळाले.कोल्हापूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे.  हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top