बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 9 व्यांदा नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ,परत एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त: सोशल मीडिया

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून,बिहारमध्ये परत एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी परत एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून,त्यांनी एनडीए चे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष,संयुक्त जनता दल,हिंदुस्तान अवाम मोर्चा व अपक्ष यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. 

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या नितीशकुमार यांचे बरोबर 8 व्यक्तींना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली असून,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री जितेंद्र राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार यांचे सह अवामी मोर्चाचे अध्यक्ष संतोष कुमार सुमन व त्यांचे बरोबर अपक्ष आमदार सुमित सिंह यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.बिहारमध्ये गेले काही दिवस चालू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीवर आज पडदा पडला असून,मी काही काळासाठी दुसरीकडे गेलो होतो, यानंतर आता मी कुठेच जाणार नसून,केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली नवीन सरकारची विकास कामे होण्याचा मार्ग सुकर होईल असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. 

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष संपुष्टात येत असून, भारतीय जनता पार्टीसाठी ही एक धोक्याची घंटा असल्याचे प्रतिपादन बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले आहे.बिहारच्या राज्याचे हित लक्षात घेऊन मी निर्णय घेतला असून,लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. एकंदरीतच बिहारमध्ये राजकीय मंचावर,राजकीय अस्थिरतेच्या स्थितीवर पडदा पडला आहे असे समजावयास हरकत नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top