पावनगडावरील अतिक्रमण हटवल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करत असून,अशीच कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणा हटवणे बाबत लवकरात लवकर व्हावी !.--सुनील घनवट समन्वयक, महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती.

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

पावनगडावरील अतिक्रमण हटवल्याविषयी प्रशासनाचे अभिनंदन करत असून,अशीच कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणावर लवकर व्हावी ! अशी मागणी सुनील घनवट, समन्वयक,महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती यांनी केली आहे.

शासनाने यापूर्वी प्रतापगड,संग्रामगडावरील अतिक्रमण काढले,नुकतेच माहिमगड येथील अतिक्रमण हटवले आहे.  महाराष्ट्रात अजूनही ३०-३५ गडांवर अतिक्रमण असून ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जलदगतीने होणे अपेक्षित आहे.यात प्रामुख्याने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात ठोस कृती होत नसून प्रारंभी पावसाळा असल्याने अतिक्रमण हटवले न जाणे आणि आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते न काढले जाणे यांमुळे ते निघालेले नाही.तरी सरकारने विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता देणे यांसह ज्या ज्या कृती करणे अपेक्षित आहे,त्या तात्काळ कराव्यात ! अशी मागणी सुनील घनवट समन्वयक,महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top