जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान 7 मे 2019 रोजी होणार असल्याने,प्रचारास राजकीय पक्षांना जवळपास 50 दिवसाचा कालावधी मिळणार आहे. कोल्हापूर महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली असून, दुसरीकडे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या दिलेल्या शब्दानुसार महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे खासदार संजय मंडलिक,धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हातकणंगलेतून शौमिका महाडिक,प्रकाश आवाडे तर कोल्हापूर मधून समरजीत घाटगे,व धनंजय महाडिक यांची नावे सुद्धा लोकसभा उमेदवारीसाठी विशेषत्वाने घेतली जात आहेत.कोल्हापूर व हातकणंगले या दोन्हीपैकी एक जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भूमिका स्वतंत्र घेतली असून,त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.विशेष प्राधान्याने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची व राजू शेट्टी यांची उमेदवारी निश्चित असून, फक्त त्यांची लढत कोणाशी होणार.? हाच सध्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय महत्त्वाचा ठरला आहे.
एकंदरीत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर ,राजकीय वातावरण रंगण्यास सुरू होईल हे मात्र निश्चित आहे.